(Tar Kumpan Yojana) शेतकऱ्यांसाठी तार कुंपण योजना 2025
शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षण करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. वारंवार वन्य प्राणी व जनावरांमुळे पिकांचे नुकसान होते. हे टाळण्यासाठी तार कुंपण योजना महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांसाठी राबवत आहे.
या योजनेत शेतकऱ्यांना काटेरी तार व लोखंडी खांबासाठी अनुदान मिळते. यामुळे पिकांचे संरक्षण, उत्पादनात वाढ आणि खर्चात बचत होते.
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली ही शेतकऱ्यांसाठी संरक्षण योजना आहे. या अंतर्गत सरकार शेतकऱ्यांना Tar Fencing Subsidy (अनुदान) उपलब्ध करून देते.
तार कुंपण योजनेत किती अनुदान मिळते?
१ ते २ हेक्टर शेतीसाठी → ९०% अनुदान
२ ते ३ हेक्टर शेतीसाठी → ६०% अनुदान
३ ते ५ हेक्टर शेतीसाठी → ५०% अनुदान
५ हेक्टरपेक्षा जास्त शेतीसाठी → ४०% अनुदान
👉 (उर्वरित खर्च शेतकऱ्याला स्वतः करावा लागतो.)
तार कुंपण योजनेचे फायदे
पिकांचे संरक्षण होते → नुकसान कमी होते
उत्पादनात वाढ होते
चोर व प्राण्यांपासून शेती सुरक्षित राहते
मजबूत साहित्यामुळे वारंवार कुंपणाचा खर्च वाचतो
तार कुंपण योजना अर्ज करण्यासाठी पात्रता व अटी
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा
- शेतीचे कायदेशीर मालक / भाडेतत्त्वावरील शेतकरी असावा
- शेती अतिक्रमणमुक्त असावी
- पिकांचे नुकसान झाल्याचा पुरावा आवश्यक
- ग्राम विकास समिती / संयुक्त वन व्यवस्थापन समितीची संमती आवश्यक
आवश्यक कागदपत्रांची यादी
शेतकरी ओळख क्रमांक (महाडीबीटी)
जात प्रमाणपत्र
बँक पासबुक (लिंक केलेले खाते)
ग्रामपंचायतीचा दाखला
समितीचा ठराव
इतर मालकांची संमती पत्र (लागल्यास)
वन अधिकाऱ्याचा दाखला
स्वयंघोषणा पत्र (इतर योजनेचा लाभ घेतलेला नसल्याचे)
तार कुंपण योजना अर्ज कसा करावा?
- ऑफलाइन पद्धत – जवळच्या पंचायत समितीकडे संपर्क साधावा.
- ऑनलाइन पद्धत – महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करावा 👉 mahadbt.maharashtra.gov.in